रत्नागिरी : तळागाळातील गरजू लोकांना कर्ज देणा या मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी चुकीच्या पद्धतीने लोकांना छळले जात आहे. सायंकाळी ६ नंतर कोणी कर्ज वसुलीसाठी गेले तर त्यांचयावर लगेचच गुन्हा दाखल करण्याची सूचना आपण दिली आहे, असे पालक मंत्रीउदय सामंत यांनी सांगितले.
मंगळवारी मंत्री सामंत यांनी वरिष्ठ अधिका यांची एक बैठक घेतली. यात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. लोकांना छळणा या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मंत्री सामंत यांनी यावेळी दिल्या आहेत.
कर्ज भरायलाच हवे, पण
मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेले कर्ज फेडायलाच हवे. मात्र सकाळी ९ ते सायंकाळी ६ हीच वसुलीची वेळ आहे. त्यानंतर वसुलीला जाणा यांवर तसेच मंजुरीपेक्षा जादा व्याजदर आकारणा या कंपन्यांवर तत्काळ गुन्हा दाखल केला जाणार आहे. अनेक महिलांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील ॲपेक्स कार्यकारिणी ३ एप्रिल रोजी याबाबत बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले.
‘महिलांकडून दमदाटीने वसुली करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार’; मंत्री उदय सामंतांचा फायनान्स कंपन्यांना इशारा
