रायगड:- जिल्ह्यात बस अपघाताची भीषण घटना घडली. महाड तालुक्यातील वरंधा घाटामध्ये महामंडळाची एसटी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 15 ते 20 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बसमधून बाहेर काढले, तसेच, बसमधील गंभीर जखमी प्रवाशांना उपाचारासाठी महाड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भोर वरंध घाटामधील एका तीव्र वळणावर चालकाचा बसवरील अचानक ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातातील जखमींवर महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.