आरसीएस अंतर्गत 10 टक्के काम पूर्ण
रत्नागिरी:-रत्नागिरी विमानतळाच्या नूतनीकरणाची प्रगती, आरसीएस अंतर्गत 10 टक्के काम पूर्ण झाल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) च्या उपाध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सोशल मिडीयावर एक अपडेट शेअर केला, त्यात हे नमूद करण्यात आले आहे.
प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजने (आरसीएस) अंतर्गत रत्नागिरी विमानतळाचा पुनर्विकास स्थिर प्रगती करत आहे. 10 टक्के काम आधीच साईटवर पूर्ण झाले आहे. 55.56 कोटी रुपयांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प प्रादेशिक हवाई संपर्क वाढवण्यासाठी, पर्यटनाला आणि प्रदेशातील आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी सज्ज आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी च्या उपाध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सोशल मिडीयावर एक अपडेट शेअर केला. ज्यामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी साईट देखरेखीचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी या उपक्रमाचे वर्णन रत्नागिरीसाठी गेम-चेंजर म्हणून केले. अपग्रेड केलेल्या विमानतळावर सुमारे 3,390 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल बिल्डिंग (झ्ऊँ) असेल, जी प्रति तास 125 प्रवाशांना हाताळण्यासाठी डिझाईन केलेली असेल.
18 महिन्यांत पूर्ण होण्याच्या नियोजित या प्रकल्पात सौंदर्यवाढीसाठी जीआरसी क्लॅडिंग आणि लँडस्केपिंगचा समावेश असेल. तसेच 950 चौरस मीटरचा युटिलिटी ब्लॉकही समाविष्ट असणार आहे. विमान वाहतूक पायाभूत सुविधांव्यतिरिक्त विकास आराखडÎात प्रतीकात्मक व सांस्कृतिक घटकांचा समावेश आहे, जसे की माझगाव रोड जंक्शनवरील भव्य प्रवेशद्वार कमान, प्रादेशिक अभिमानाचे प्रतिनिधीत्व करणारा ध्वजस्तंभ आणि रत्नागिरीच्या प्रसिद्ध अल्फोन्सो आंब्याला आदरांजली वाहणारा एक अद्वितीय आंबा बोन्साय बाग समाविष्ट आहे.
डोर्श प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) म्हणून काम करत असताना आणि न्याती कंत्राटदार म्हणून काम करत असल्याने, पुनर्विकासाचे उद्दिष्ट रत्नागिरीला एक प्रमुख विमान वाहतूक केंद्रात रूपांतरित करणे, हे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची आणि प्रदेशाच्या आर्थिक आणि पर्यटन क्षेत्रांना पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये पांडे यांनी हा प्रकल्प कधी पूर्ण होणार आहे, या विषयावर कसलाही उल्लेख केलेला नाही.