घाटात अनेक गाड्या अडकून पडल्याच्या घडल्या होत्या घटना
रत्नागिरी : गोव्याहून संगमेश्वरच्या दिशेने जाताना मोबाईलवरील लोकेशनवरून शॉर्टकट मारण्याच्या नादात उक्षी घाटात कंटेनर अडकल्याच्या घटना मे ते ऑगस्ट 2024 दरम्यान घडल्या होत्या. आणि आजही घडत आहेत.त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. रस्ता अरुंद, वळणाचा आणि घाट असल्यामुळे कंटेनरसारखी मोठी वाहने अडकून वाहतूक कोंडी होत होती. याबाबत उक्षी ग्रामस्थांनी रत्नागिरी सा. बा. विभागाला या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी केली होती. मात्र या घाटात सलग 3-4 वेळा मोठे कंटेनर अडकल्याने अखेर सा. बा. विभागाने उक्षी घाटातून अवजड वाहतुकीला बंदी असणारे फलक दोन्ही बाजूने लावले आहेत. त्यामुळे उक्षी ग्रामस्थांच्या मागणीला यश आले आहे.
दरम्यान उक्षी घाटात १९ मे २०२४ ला एका खाजगी आराम बसचा अपघात झाला होता. अवघड वळणाचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला होता. त्यानंतर 5 जून 2024 ला एक गॅस टँकर इथे अडकला होता. आज 26 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे कोळसा भरलेला ट्रक अडकला होता. त्यामुळे रात्रीपासून सकाळपर्यंत वाहतूक खोळंबली होती. 19 ऑगस्ट रोजीही अशाचप्रकारे एक ट्रक सायंकाळच्या सुमारास या घाटात फसला होता. अशा अनेक घटना घडल्या होत्या.
या वाढत्या घटना लक्षात घेऊन सा. बा. विभागाने करबुडे येथील उतारावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याचा बोर्ड लावला आहे. तर वांद्री येथून उक्षी ब्रीज वर घाटातून अवजड वाहतुकीला बंदी असलेला फलक लावला आहे. त्यामुळे उक्षी ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे.