रत्नागिरी जिल्ह्यात १३६० हेक्टरवर लागवड
मुंबई: राज्यात यंदा आतापर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उद्दिष्टाच्या ६८ टक्के म्हणजे ४० हजार ८१९ हेक्टरवर (६८.०३ टक्के) फळबाग लागवड झाली आहे. ७२ हजार ९०० हेक्टरवर फळबाग लागवड करण्यासाठी अनुदान मिळावे म्हणून ९० हजार ६९५ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.
आतापर्यंत लागवड क्षेत्रात पारघर जिल्हा अव्वल आहे तर दिलेल्या उद्दिष्टानुसार लागवड क्षेत्र पाहिले तर पाच जिल्ह्यांत उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आतापर्यंतची लागवड स्थिती पाहता यंदाही फळबाग लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसत असून, आणखी दोन महिन्यांत लागवड क्षेत्र वाढेल असा अंदाज आहे.
शासनाचा फळबाग लागवडीवर भर आहे. पाच एकर क्षेत्राच्या आतील तसेच जॉबकार्ड असलेल्या शेतकऱ्यांना रोजगार मिळावा आणि फळबाग लागवडही व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अनुदान देत फळबाग लागवड केली जाते. पाच एकरांपेक्षा अधिक क्षेत्र लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आहे. यंदा बऱ्याच भागात पाण्याची स्थिती चांगली आहे.
फळबाग योजनेमधून अकोला जिल्ह्यात ४०० हेक्टरवर लागवड
शिवाय फळबाग लागवड फायदेशीर ठरत असल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव पाहून अनेक शेतकरी फळबाग लागवडीकडे वळल्याचे पाहायला मिळत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून (नरेगा) फळबाग लागवड केली जात आहे. ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळावा यासाठी ही योजना आहे. यंदा (२०२४-२५) राज्यात ६० हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे.
आतापर्यंत उद्दिष्टाच्या ६८.०३ टक्के म्हणजे ४० हजार ८१९ हेक्टरवर लागवड झाली आहे. शेतकऱ्यांनी अनुदान मागणीसाठी केलेल्या जवळपास ९५ टक्के अर्जाला अर्जाला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आलेली आहे. आतापर्यंतच्या लागवडीचा विचार करता लागवड क्षेत्रात सर्वाधिक पालघर जिल्ह्यात ३७९३ हेक्टरर लागवड झाली आहे.
मनरेगाअंतर्गत ३६७ हेक्टर फळबाग लागवड
पालघर, धुळे, नंदुरबार, बुलडाणा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत फळबागांची लागवड उद्दिष्टापेक्षा अधिक झाली आहे. ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, जळगाव, अहिल्यानगर, सातारा, धाराशिव, हिंगोली, अकोला, वाशीम, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांत बऱ्यापैकी फळबाग लागवड झाली आहे. लातूरमध्ये सर्वांत कमी म्हणजे लक्ष्यांकाच्या केवळ १५.०१ टक्के फळबाग लागवड झाली आहे.
राज्यात १० हजार ६२० कृषी सहायक असून त्यादृष्टिने त्यांना उद्दिष्ट देऊन फळबाग लागवड करून घेतली जाते. यंदा आतापर्यंत ४० हजार हेक्टरच्यावर फळबाग लागवड झाली असल्याने यंदा गतवर्षीपेक्षा अधिक लागवड होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
फळबाग लागव़़ड स्थिती
– लागवड लक्ष्यांक ः ६० हजार हेक्टर
– लाभार्थी अर्ज संख्या ः ९०,६९५
– लाभार्थी अर्ज मागणी क्षेत्र ः ७२,९०० हेक्टर
– तांत्रिक मान्यता ः ६९,५८९ हेक्टर
– तांत्रिक मान्यतेची टक्केवारी ः ९५
– प्रशासकीय मान्यता ः ६८,६६५ हेक्टर
– खड्डे खोदलेले क्षेत्र ः ४१,८६४ हेक्टर
– आतापर्यंतची लागवड ः ४०,८१९ हेक्टर (६८.०३ टक्के)
जिल्हानिहाय लागवड क्षेत्र (हेक्टर)
ठाणे ः १,१५४, पालघर ः ३,७२३, रायगड ः १,५८७, रत्नागिरी ः १,३६०, सिंधुदुर्ग ः १,२०९, नाशिक ः २,१५६, धुळे ः १,१३६, नंदुरबार ः २,५३८, जळगाव ः १,४०९, अहिल्यानगर ः १,७०४, पुणे ः १,३१८, सोलापूर ः १,८४५, सातारा ः ९७८, सांगली ः ७३३, कोल्हापूर ः ११५, छत्रपती संभाजीनगर ः ३६५, जालना ः ९७५, बीड ः ५३२, लातूर ः २२५, धाराशिव ः ७७५, नांदेड ः ४३१, परभणी ः ३४२, हिंगोली ः ४७१, बुलडाणा ः २,५५३, अकोला ः ९०२, वाशीम ः ७९३, अमरावती ः २,०००, यवतमाळ ः २,१९४, वर्धा ः ४४०, नागपूर ः ९४९, भंडारा ः ३८२, गोंदिया ः १,३८९, चंद्रपूर ः १,०६४, गडचिरोली ः १,०५६.