दोन आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडली, चर्चे अगोदर उपोषण सोडण्याची मुंबई विद्यापीठाची मागणी उपोषणकर्त्यांनी फेटाळली
मंडणगड:- आंबडवे येथील विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी सेवेत कायम करण्याच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी आमरण उपोषण छेडले आहे. सलग तिसऱ्या दिवशीही हे आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान, दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती सोमवारी खालावल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात प्रशासनाद्वारे पाठवण्यात आले. चर्चे अगोदरच मुंबई विद्यापीठाने उपोषण सोडण्याची केलेली मागणी उपोषणकर्त्यांनी धुडकावली असून मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सुशांत सकपाळ, अमोल सकपाळ, निलेश सकपाळ, उदय जाखल, सुजाता सकपाळ, विनीत सकपाळ, प्रिती तांबे, प्रफ्फुल तांबे, राजेंद्र राऊत, रमेश सकपाळ, सौरव सकपाळ, प्रशांत सकपाळ, अक्षय सकपाळ हे जागृती मंडळाचे सुदर्शन सकपाळ व ग्रामस्थांसह आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे उपोषणास बसले आहेत.
यावेळी कर्मचाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, आंबडवे येथे झालेल्या महाविद्यालयास ग्रामस्थांनी 13.50 एकर मोफत जागा उपलब्ध करुन दिली. असे असताना मुंबई विद्यापीठाने ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. देणगीदारांपैकी सात कुंटबातील व्यक्तींना कामावर घेण्यात आले. अद्याप सहा कुटुंबातील व्यक्तींना रोजगार मिळालेला नाही. कामावर घेतलेल्या सात शिक्षकेतर कर्मचाऱयीं केंद्र व राज्यशासनाच्या कर्मचारी भरतीच्या नियमानुसार भरती केलेली नाही. सर्व कर्मचाऱयांना ठेकेदारी पद्धतीने कामावर घेतले आहे. त्यांना अद्याप कायम करण्यात आलेले नाही. या संदर्भात वेळोवेळी आवाज उठवूनही ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले.
दोघांची तब्बेत खालावली
उपोषण करणाऱ्या नीलेश सकपाळ व प्रिती तांबे या दोघांची प्रकृती सोमवारी खालावल्याने त्यांना प्राथमिक तपासणी करून मंडणगड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाचे बैठकीचे निमंत्रण
दरम्यान, सोमवारी प्रशासनाच्यावतीने समन्वयक दीपक रावेरकर व मंडळ अधिकारी प्रकाश साळवी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. मुंबई विद्यापीठाकडून आलेले पत्र त्यांना वाचून दाखवले. त्यानुसार मंगळवारी कुलगांनी यासंदर्भात मुंबई येथे बैठक बोलावल्यो उपोषणकर्त्यांना सांगितलो होते. मात्र ााााxअगोदर उपोषण सोडण्यो उपोषणकर्त्यांनी अमान्य केले.