रत्नागिरी : दावोस येथे व्हीआयटी सेमीकंडक्टर कंपनीसोबत 19,550 कोटींच्या ऐतिहासिक गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला आहे. हा प्रकल्प केवळ रत्नागिरीसाठीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
सेमीकंडक्टर या प्रकल्पामुळे आपण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठं पाऊल टाकत आहोत. या गुंतवणुकीमुळे रत्नागिरीकरांना हजारो रोजगार निर्माण होतील, तरुणांना नवीन संधी मिळतील, आणि आपल्या मतदारसंघाचा विकास झपाटयाने होईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मी तुम्हाला दिलेलं वचन पाळत आहे. रत्नागिरीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत कार्यरत राहीन. हा प्रकल्प आपणा सर्वांच्या सहकार्याशिवाय शक्य झाला नसता. हा केवळ माझ्या कामाचा विजय नाही, तर आपला विजय आहे! आता वेळ आली आहे रत्नागिरीला जागतिक स्तरावर नेण्याची! आणि रत्नागिरीच्या नागरिकांची वचनपूर्तीची असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.