रत्नागिरी : शहरालगतच्या मिऱ्या येथे मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरटयानी चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आह़े. ही घटना 27 डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 या कालावधीत घडल़ी. एकूण 80 हजार रुपये किंमतीच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या असल्याचे शहर पोलिसात दाखल करण्यात आले आह़े. त्यानुसार पोलिसांनी चोरी करणाऱ्या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र कृष्णा साळवी (42) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होत़ी. त्यानुसार महेंद्र साळवी हे मिऱ्या येथील मोबाईल टॉवरच्या देखरेखीचे काम करतात़. या टॉवरच्या तळाशी पत्र्याची बंदीस्त केबीन असून त्यामध्ये बॅटऱ्या ठेवण्यात आल्या होत्य़ा. 27 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत चोरटयाने पत्र्याच्या केबीनचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केल़ा तसेच आतील बॅटऱ्या चोरुन नेल्या, अशी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आह़े. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.