मुख्याधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी
रत्नागिरी : मनसेच्या दणक्यानंतर अखेर थिबा पॅलेस येथील ते बांधकाम हटवण्यात आले आहे. या बांधकाम प्रकरणी मुख्याधिकारी यांचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील थिबा पॅलेस परिसरातील वाहनतळ आरक्षण जाणे हे न. प. प्रशासनाचे अपयश व गलथान कारभाराचे उदाहरण आहे, असा आरोप करत याप्रकरणी मुख्याधिकारी तथा प्रशासक तुषार बाबर यांची खातेनिहाय चौकशी करावी व तोपर्यंत त्यांचे निलंबन व्हावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. थिबा पॅलेस परिसरातील अनधिकृत पत्र्याचे बांधकाम न. प. कडून काढण्यास सुरुवात सुरवात झाली आहे. या प्रसंगी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
याविषयी अधिक बोलताना जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर म्हणाले की याबाबत जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितले की “मीं जिल्हा नियोजन चा निधी उपलब्ध होवू शकतो. आत्ता सुद्धा द्यायला तयार आहे.”. जिल्हाधिकारी व जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांची निधी बाबतची तत्परता जगजाहीर असताना मुख्याधिकारी यांनी हा विषय स्वतः पुरताच मर्यादीत ठेवला? यां सर्वांना विश्वासात घेऊन आरक्षित जागेच्या खरेदीचा प्रश्न कां नाही सोडवला? शहर विकास आराखडा बांधताना प्रत्येक हजारी माणसामागे किती जागा आरक्षित ठेवायाची असते? आरक्षण कशाला असते याची काहीच माहिती मुख्याधिकारी ना नाही का? असे प्रश्न मनसेने उपस्थित केले आहेत.
.या प्रकारणा मध्ये जे जे दोषी आहेत आणी रत्नागिरी शहर विकास आराखड्याची जे कोणी वाट लावत आहेत त्या सर्वाना घरी पाठविल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर यांनी सांगितले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर,कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, शहर अध्यक्ष बाबय भाटकर, मा. तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, शहर सचिव प्रभात सुर्वे कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ: रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषद कर्मचारी यांनी अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली.
मनसेच्या दणक्यानंतर थिबा पॅलेस येथील ते बांधकाम हटवले
