रत्नागिरी : तालुक्यातील पावस गोडबोलेवाडी येथे मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरटयानी चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आह़े. ही घटना 28 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 या कालावधीत घडल़ी. एकूण 80 हजार रुपये किमतीच्या 45 बॅटऱ्या चोरीला गेल्याचे पुर्णगड पोलिसांत दाखल करण्यात आले आह़े. त्यानुसार पोलिसांनी चोरी करणाऱ्या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा.
सुहास दत्ताराम चव्हाण (44, ऱा गवाणे लांजा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होत़ी. त्यानुसार सुहास चव्हाण हे पावस गोडबोलेवाडी येथील मोबाईल टॉवरच्या देखरेखीचे काम करतात़. या टॉवरच्या तळाशी पत्र्याची बंदिस्त केबीन असून त्यामध्ये बॅटऱ्या ठेवण्यात आल्या होत्य़ा. 28 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत चोरटयाने पत्र्याच्या केबीनचे कुलुप तोडून आतमध्ये प्रवेश केल़ा तसेच आतील 45 बॅटऱ्या चोरुन नेल्या अशी तक्रार पुर्णगड पोलिसांत दाखल करण्यात आली आह़े.
पोलिसांनी याप्रकरणी चोरटयाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 334(1), 305 (अ) नुसार गुन्हा दाखल केल़ा. पुढील तपास पुर्णगड पोलिसांकडून करण्यात येत आह़े.