रत्नागिरी:-शहरातील मुरुगवाडा येथे 13 वर्षीय मुलाचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. आसिफ लतीफ शेख (13, रा.मुरुगवाडा रत्नागिरी) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 जुलै 2024 रोजी सकाळी आसिफ याचा मृतदेह विहिरीत बुडालेल्या स्थितीत आढळून आला. खेळताना तो विहिरीत पडला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याप्रकरणी शहर पोलिसांकडून घटनेची नोंद करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.