रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हा परिषदेला चालू वर्षी आंतरजिल्हा बदल्या तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या संख्येमुळे सुमारे 2 हजार पदं रिक्त होती. मात्र शासनाने 1 हजार पदं भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार मे महिन्यात 997 शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे भरती झाली. पण आता पुन्हा नव्याने 367 शिक्षकांची भरती येत्या 15 दिवसात होणार असल्याची माहिती जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी दिली. रत्नागिरी जिल्हा परिषदेला पुन्हा नव्याने मिळणाऱ्या या प्राथमिक शिक्षकांची पवित्र पोर्टलवरून भरती प्रकिया होणार आहे. येत्या पंधरा दिवसात त्या उमेदवारांचे कागदपत्र तपासणी होणार आहे. त्या कार्यवाहीमुळे महिनाभरात हे नवे शिक्षक कामावर रुजू होणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांच्या संख्येमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक कारभार चालवताना जि.प. प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. नुकत्याच सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षी आंतरजिल्हा बदल्या तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या संख्येमुळे जवळपास 2 हजार पदं रिक्त होती. पण शासनाने 1 हजार शिक्षक पदे भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार पवित्र पोर्टलद्वारे मे महिन्यात 997 शिक्षकांची भरती झाली.
त्यामुळे शिक्षण विभागाला मोठा दिलासा लाभला होता. पण आता रिक्त असलेल्या शिक्षक पदांसाठी शासनाने पुन्हा एकदा नव्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यात मराठी माध्यमासाठी 348 व उर्दू माध्यमासाठी 19 शिक्षक पवित्र पोर्टलमधून भरण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली असल्यो सांगण्यात आले. येत्या 15 दिवसात त्या शिक्षक उमेदवारांया कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर या शिक्षकांना नियुक्या दिल्या जाणार आहेत. यामुळे महिनाभरात हे शिक्षक शाळेवर रुजू होणार असल्याने आता शिक्षकांच्या रिक्त पदांची अडचण काही अंशी कमी होणार आहे. पण हे नवे शिक्षक मिळाल्यानंतरही आता फक्त 657 पदे रिक्त राहणार आहेत.