खेड:-रायगड जिल्ह्यातील महाड-विन्हेरे मार्गावर गावारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर अचानक आडव्या आलेल्या गुरांमुळे चालकाने ब्रेक लावल्याने इर्टिगा कार उलटून झालेल्या अपघातात सहाजण जखमी झाले.
सागर वसंत गुंजाळ (30, रा. अंधेरी), रोशन कृष्णमोहन त्रिपाठी (28, वसई), सोनू राजाराम पटेल (30, वसई), राजेश मुपुंद निर्भवते (50, गोरेगाव), पंकज
प्रकाश पवार (50, गोरेगाव), देवदत्त वासुदेव घाटी (30, विरार) अशी जखमींची नावे आहेत. ते आपल्या ताब्यातील इर्टिगा कारमधून (एमएच-47/एजी-6610) पवास करत असताना महाडजवळील शिरगाव ग्रामपांयतिच्या हद्दीतील गोमंतक हॉटेलनजीक रस्त्यावर अचानक गुरे आडवी आली. या गुरांना वाविण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक मारल्याने कार जागेवरच उलटली. यामध्ये 6 जन जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी महाड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी जात जखमींना मदतकार्य केले.
गुरे आडवी आल्याने कारला अपघात, सहा जखमी
