रत्नागिरी:-शिमगोत्सवासाठी मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यासाठी येत्या २० मार्चपासून १०४ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोकणातील विविध ठिकाणी या गाड्या चाकरमान्यांना मुंबईतून घेऊन येणार आहेत.
कोकणात गणेशोत्सव आणि शिमगोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. गणेशोत्सवासाठी रत्नागिरी विभागातून जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात येते. त्याप्रमाणे शिमगोत्सवासाठीही जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोकणात तेरसे आणि भद्रे शिमगे साजरे करण्यात येतात. येत्या रविवारी २४ मार्च रोजी होळी, तर दुसऱ्या दिवशी धूलिवंदन आहे. त्याला भद्रे शिमगे म्हटले जाते. या शिमग्यांच्या दोन दिवस आधी तेरसे शिमगे साजरे होतात. त्यामुळे २० मार्चपासून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
रत्नागिरी विभागातील नऊ आगारात जादा गाड्या येणार आहेत. त्याप्रमाणे परतीसाठीही जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा गाड्यांची उपलब्धता रत्नागिरी विभागाने केली आहे. मुंबईतून जिल्ह्यात येण्यासाठी ५० तर जिल्ह्यातून मुंबईला जाण्यासाठी ५४ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
शिमगोत्सवासाठी मुंबईहून रत्नागिरी जिल्ह्यासाठी २० मार्चपासून जादा गाड्या
