चिपळूण:-चिपळूण तालुक्यात अनेक वाईट घटना घडत आहेत. आज काळजाला धडकी भरवणारी घटना घडली. कादवड येथे वैतरणा नदीलगत दोन शाळकरी मुलींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या मुलींचा घातपात असल्याचा संशय असून पोलीस तपास करीत आहेत. सोनाली राजेंद्र निकम (वय 14) आणि मधुरा लवेश जाधव (वय 14 रा. कादवड) अशी मृत विद्यार्थिनीची नावे आहेत. मोहन विद्यालय अकले शाळेच्या इयत्ता नववीतील या दोन्ही विद्यार्थिनी आहेत. कातकरी समाजातील या गरीब कुटुंबातील मुली असून त्यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त होत आहे.
शनिवार 16 मार्च रोजी दुपारी
दीड वाजण्याच्या सुमारास कादवड वैतरणा नदीतील एका डोहाजवळ त्यांचे मृतदेह आढळून आले. यानंतर तेथील ग्रामस्थांनी शिरगाव पोलिसांना ही खबर दिली. पोलीस दाखल होताच त्यांनी तात्काळ दादर
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन्ही मृतदेह आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
चिपळुणात दोन शाळकरी मुलींचे नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ
