दापोली:-केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून ‘बेस्ट टुरिझम व्हिलेज 2024′ या स्पर्धेत कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कर्दे गावाची निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेची पहिली फेरी पूर्ण झाली असून अंतिम फेरी एक-दोन-तीन दिवसात पूर्ण होईल. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारी वसलेले कर्दे हे गाव पर्यटनाचे आकर्षण ठरले आहे.
स्वच्छ समुद्रकिनारा, पांढरी वाळू, या गावाचे खास वैशिष्ट्य आहे. केंद्र शासनाच्या पर्यटन विभागातील महाराष्ट्रातील सुमारे 126 ग्रामपंचायतीने यामध्ये सहभाग दर्शवला. या स्पर्धेत कर्दे गावातील पर्यटन उद्योग आर्थिक महिलांचे सबलीकरण, जैवविविधता उद्योग, दळणवळण, नैसर्गिक स्त्राsत वापरून केलेले जलव्यवस्थापन पर्यटन उद्योग आधारित रोजगार निर्मिती, सामाजिक जीवन आदींचा विचार करण्यात आला आहे. गावातील नैसर्गिक स्त्राsतांचा योग्य वापर कशाप्रकारे करण्यात आला, या बाबतची माहिती सरपंच सचिन तोडकर यांनी दिली. या निवडीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचे संचालक डॉक्टर बी. एन. पाटील यांनी कौतुक केले आहे.